नागपूर, दि. ४ : संगीत हे ईश्वरासोबत जोडले जाण्याचे एक प्रभावी माध्यम असून त्याची साधना केल्याने मानसिक स्वास्थही चांगले राहते. संगीतात ही नैसर्गिक क्षमता असल्यामुळे मुलांना बालपणापासून शारीरिक, बौद्धिक विकास साधण्यासाठी संगीताची गोडी निर्माण करणे गरजेचे आहे. शास्त्रीय संगीताचे आध्यात्मिक महात्म्य ‘रागरंजन’ या पुस्तकात अंतर्भूत असून या क्षेत्रात कारकीर्द घडविणाऱ्यांसाठी …
Read More »Yearly Archives: 2022
‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’निमित्त हिंदी साहित्य अकादमीतर्फे मुंशी प्रेमचंद यांच्या कथांचे सादरीकरण
मुंबई, दि. 5 : राज्यात “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. याअंतर्गत महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी, मुंबई आणि रामनिरंजन झुनझुनवाला महाविद्यालय (स्वायत्त), घाटकोपर यांच्या संयुक्त विद्यमाने मुंशी प्रेमचंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या निवडक कथांचे सादरीकरण करण्यात आले. हिंदी भाषा आणि साहित्याच्या सर्वांगीण विकासासाठी या अकादमीतर्फे सांस्कृतिक कार्यक्रम …
Read More »ज्ञानेश्वरी शिंदे तलवारबाजीत गाजवणार आंतरराष्ट्रीय मैदान; जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या सी. एस.आर. फंडाने दिला मदतीचा हात
लातूर दि.6 ( जिमाका ) शिरूर ताजबंद येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयाची ज्ञानेश्वरी माधव शिंदे हिची तलवारबाजीत इंग्लड येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली असून लातूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने सी एस आर मधून एक लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आहे. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.,उपसंचालक श्री.सुधीर मोरे यांच्या सकारात्मकतेतून व …
Read More »आशियातील सर्वात मोठ्या टाटा मुंबई मॅरेथॉनला गौरवशाली परंपरा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. 10 : टाटा मुंबई मॅरेथॉन ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शासनाकडून सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. जगभरातील धावपटूंचे आकर्षण असलेली ही स्पर्धा 15 जानेवारी 2023 मध्ये होणार असून या स्पर्धेसाठी इच्छुकांनी नोंदणी करावी, असे आवाहन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले. हॉटेल ट्रायडंट येथे …
Read More »दुर्मिळ चित्र प्रदर्शनाचा नागरिकांनी लाभ घ्यावा – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड
औरंगाबाद, दि. 13 (जिमाका) : भारतावर अनेक वर्ष इंग्रजांनी राज्य केले. त्यांच्याविरोधात अनेकांनी लढा देऊन देश स्वतंत्र केला. त्यांच्यामुळेच आपल्या देशाचा स्वातंत्र्य अमृत महोत्सव साजरा होतो आहे. त्याचाच भाग म्हणून देशातील स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित ऐतिहासिक घटनांची मांडणी चित्र प्रदर्शनातून पहावयास मिळते आहे, ही उल्लेखनीय बाब आहे. या दुर्मिळ अशा चित्र …
Read More »महाराष्ट्राला साहित्याची समृद्ध परंपरा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
पुणे दि. १४: महाराष्ट्राला साहित्याची समृद्ध परंपरा लाभली आहे. राज्यात साहित्यनिर्मितीसाठी उत्तम वातावरणदेखील आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. राजभवन येथे आयोजित ‘चाकोरीबाहेरचे शिक्षण’ या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे, प्र-कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, कुलसचिव प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषदेचे …
Read More »देशातील युवा वर्ग सर्वच क्षेत्रात अग्रेसर राहील- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
पुणे, दि.१५: देशातील युवा वर्ग विज्ञान, शिक्षण, वाणिज्य, उद्योग, आरोग्य, शिक्षण आदी सर्वच क्षेत्रामध्ये आपली विजयपताका फडकवेल असा विश्वास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या युवा संकल्प अभियानाच्या समारोप कार्यक्रमात व्यक्त केला. युवा संकल्प अभियान आणि तसेच या अभियानांतर्गत राष्ट्रध्वजासोबत छायाचित्रांचा संग्रह अपलोड करण्याच्या गिनिज विश्व विक्रमाची …
Read More »महाराष्ट्र सदनात ‘स्वातंत्र्य दिन’ साजरा निवासी आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण
महाराष्ट्र सदनात ‘स्वातंत्र्य दिन’ साजरा निवासी आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण नवी दिल्ली, 15 : भारतीय स्वातंत्र्याचा 75वा वर्धापन दिन राजधानीतील उभय महाराष्ट्र सदनांमध्ये मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. सचिव तथा प्रभारी निवासी आयुक्त डॉ.निधी पांडे यांच्या हस्ते कस्तुरबा गांधी मार्ग आणि कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनांमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी समूह …
Read More »स्वातंत्र्य संग्रामातील 1857 ते 1947 कालखंडाच्या दुर्मिळ चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन
स्वातंत्र्य काळातील इतिहास युवकांना प्रेरणादायी- खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरोचा उपक्रम सोलापूर, दि.15 (जिमाका) : भारतीय स्वातंत्र्य संग्रामात अनेक स्वातंत्र्यसेनानींनी कुटुंबाचा त्याग केला. कठोर कष्ट घेतले, स्वत:चे बलिदान दिले. त्यांचा स्वातंत्र्य काळातील इतिहास आजच्या पिढीला प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी केले. …
Read More »स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वारसा स्थळ रॅली
सोलापूर, : जिल्हा प्रशासन, शालेय शिक्षण, क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित शनिवारी (दि.13) सकाळी 7.30 वाजता वारसा स्थळ भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीचा शुभारंभ उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा समन्वयक चारुशिला देशमुख यांनी झेंडा दाखवून केला. यावेळी त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. वारसा स्थळ रॅलीमध्ये राष्ट्रीय खेळाडू, स्काऊट …
Read More »