जालना /प्रतिनिधी – महापुरुषांचे जयजयकार ऐवजी विचार आत्मसात करणे आता काळाची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ जालना शाखेच्या वतीने आयोजित सन्मान व वार्तालाभ कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रीय शिवशाहीर व मराठवाडा लोकविकास मंच पुरस्कार प्राप्त शिवशाहीर अरविंद घोगरे यांनी दिनांक ३० नोव्हेंबर मंगळवारी कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले यावेळी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष दिगंबर गुजर, शाहीरबाणा सहकारी ज्ञानेस जाधव याची उपस्थिती होती.

पुढे बोलताना शिवशाहीर घोगरे म्हणाले की,तरुणांनी जीवनात वेळेचे नियोजन करणे गरजेचे आहे कारण वेळेचे भान नसलेले कधीही यशस्वी होऊ शकत नाही कारण संधीची वाट पाहू नका संधी जीवनात निर्माण कराव्या लागते असे ही त्यानी सांगितले
पत्रकाराशी चर्चा करताना त्यांनी जिवनातील अनेक गोष्टी यावेळी सांगितल्या दर दरम्यान महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने त्याचा सन्मान करण्यात आला